अंतरवाली सराटीमध्ये आयोजित सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत.
जालना, 14 ऑक्टोबर : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता. या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला.
काय आहेत नेमक्या मागण्या?
- महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा
- कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी
- मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांच्या कुटुंबीयांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी
- दर दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा, तो केलेला नाही, सर्व्हे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात
- सारथी संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सगळे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत.
- महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल.
- मात्र एनटी, व्हीजीएनटीचा प्रवर्ग टिकला तसा टिकला तरच आम्ही ते आरक्षण घेणार, अन्यथा 50 टक्यांच्यावर आरक्षण घेणार नाहीत.