व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

“२४ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

मराठ्यांचं आरक्षण कुणामुळे रोखलं गेलं त्याची यादीच जाहीर करु असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

माझी प्रकृती आता व्यवस्थित झाली आहे. मी पुढच्या दोन तीन दिवसात माझं काम पुन्हा सुरु करतो आहे. मराठा समाजासाठी सरकारकडून जोरदार काम सुरु आहे. मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्रं पडू लागली आहेत. जेव्हा नाराजी व्यक्त करायची होती तेव्हा आम्ही ती व्यक्त केली पण आज पूर्ण ताकदीने सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करतं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी कक्षही सुरु केले आहेत. यावरुन लक्षात येतं आहे की सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करत नाही. जर त्यांनी दिरंगाई केली तर आम्ही सावध आहोतच.

Leave a Comment