व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

वादळाची स्थिती काय?

वादळाची स्थिती

सध्या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही पूर्व किनारपट्टी भागामध्ये पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दित आहे. याचे परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसणार असून, इथं भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ताशी 40 किमी वेगानं वारे वागून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आगे. या भागांना सध्या पावसाचा यलो अलर्ट देत नागरिकांनाही सतर्क करण्यात आलं आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पश्चिमी झंझावातामुळं हवामानात अनेक बदल दिसून येत आहेत. जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. मागील 24 तासांमध्ये काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडली, इथं पहलगाम भागात तापमान 5 अंशावर पोहोचलं तर, काश्मीरच्या खोऱ्यात हिमवृष्टीनं अनेक रस्ते बंद झाले. हिमाचलच्या पर्वतीय भागांमध्येसुद्धा हीच परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडे थंडीचा कडाका दिवसागणिक वाढत जाऊन त्याचे परिणाम मध्य भारतापर्यंत दिसून येणार आहेत.

Leave a Comment