व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

दुष्काळ जाहीर कधी केला जातो?

पैसेवारी कशी काढावी याचे सरकारी निकष ठरलेले आहेत. उदा.-शेतीचा नैऋत्य कोपरा घ्यावा, पाणीपुरवठ्याची स्थिती बघावी इत्यादी.

त्यानुसार त्यात आवश्यक ती नियमानुसार वाढ/घट करण्यात येते.

अशा प्रकारे काढलेल्या पैसेवारीची सरासरी 50 पेक्षा कमी असल्यास दुष्काळ आणि त्यापेक्षा जास्त असल्यास सुकाळ असं समजलं जातं.

पैसेवारीमुळे राज्य सरकारला राज्याच्या धान्य स्थितीचा आढावा घेणं सहज शक्य होतं.

लोकसंख्येनुसार मग आवश्यकता तपासून धान्य आयात वा निर्यात करण्याबाबतचे निर्णय करून पुढचं धोरण आखलं जातं.

हेही नक्की वाचा👇👇👇👇

अतुल देऊळगावकर म्हणतात की, “दुष्काळ मोजण्याचे जे वेगवेगळे निकष आहेत त्यांचा अभ्यास केल्यास दुष्काळाचे मुख्यतः तीन प्रकार दिसून येतात.

शेती, पाणी आणि महसूल अशा तीन मुख्य निकषांवर कोणता आणि कसा दुष्काळ आहे ते ठरवलं जातं.

दुष्काळग्रस्त भागातील पिकांचं किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्या भागातील जलस्थिती नेमकी कशी आहे म्हणजेच जमिनीखाली किती पाणी आहे आणि जमिनीच्यावर किती पाणी आहे याचा अभ्यास केला जातो.

उदाहरणार्थ आपल्याकडे 1972मध्ये जो दुष्काळ पडला होता त्यावेळी पाण्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली होती.

तसंच, त्यावेळी अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता त्यामुळे लोकांना अन्नधान्य पुरवावं लागलं होतं.”

Leave a Comment